Thursday, 24 October 2024

भारतीय कलांचा इतिहास

 कला म्हणजे काय?

स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावभावना नाही इतरपर्यंत पोहोचावे ही प्रत्येक व्यक्तीची प्रवृत्ती असते. या प्रवृत्तीच्या प्रेरणेने जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली होती, तेव्हा तिला कला असं म्हटलं जातं कारण निर्मितीच्या मुळाशी कलाकारांची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात.

दुक्कलां आणि ललित कला:

दृक कला आणि ललित कला अशी कलाप्रकारांची विभागणी केली जाते. ललित कलांना अंगिक कला असं म्हटलं जातं. ललीत कलाना अंगीक कला असेही म्हणतात. दृकलांचा उगम प्रगतीहासिक काळात झाला, हे दर्शवणारे अनेक कला नमुने जगभरातील अश्मयुगीन गुहांमधून प्राप्त झालेले आहेत.
लोककला आणि अभिजात कला: 
कलेच्या लोककला आणि अभिजित कला अशा दोन परंपरा मानले जातात. लोक कला ही बसमधून काळापासून अखंडपणे चालत आलेले परंपरा आहे. तिचा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो. त्यामुळे या परंपरेतील अवि व्यक्ती अधिक उत्स्फूर्त असते. लोकप्रयाची निर्मिती समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होते. प्रामाणिक नियमांच्या चौकटीत बांधलेली असते. ती आत्मसत करण्यासाठी दीर्घकालीन काही प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
कलाशैली:
कलाने निर्मितीची प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र पद्धत म्हणजे शैली असते. एखादी पद्धत जेव्हा परस्परांचे स्वरूप धारण करते तेव्हा ती पद्धत विशिष्ट कला शैली म्हणून ओळखले जाऊ लागते. प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडाशी आणि प्रदेशाची निगडित असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कला शैली विकसित होतात. त्या शैलीच्या आधारे त्या त्या संस्कृतीमधील कलेच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो.
भारतातील दृक कला परंपरा:
दृककलामध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो.
चित्रकला: 
चित्रकला द्विमतीय असते. उदाहरणार्थ, निसर्ग चित्र, वस्तू चित्र, व्यक्तिचित्र, वस्तूचे आरेखन इत्यादी चित्र रेखाटले जातात. त्यासाठी शिलाखंड, भिंती, कागद, सुती किंवा रेशमी कागदाचे फलक, मातीची भांडी यासारख्या माध्यमांचे उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, अजिंठा लेण्यांमधील बोधिसत्व पद्मपणीच भिंती चित्र.
लोक चित्रकला शैली:
अश्मयुगून काळातील गुहाचित्रे अनेक देशांमध्ये आढळून येतात. 
 भारतामध्ये मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये गुहाचित्रे असलेली स्थळे आहेत. मध्य प्रदेशातील भीम बैठका येथील गुहाचित्र प्रसिद्ध आहेत. भीम घटकांचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळे करण्यात आलेला आहे. गुहाचित्रांमध्ये मनुष्याकृती हा प्राणी आणि काही भौतिक आकृतींचा समावेश होतो. पुराश्मयुक्त शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळापर्यंत चित्रांची शैली त्यांचा विशेष यामध्ये बदल होत गेलेले आढळतात. चित्रामध्ये नवीन प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश झालेला दिसतो तसेच भविष्याकृतींचा रेखाटण्याचा पद्धतीत आणि वापरलेल्या रंगांमध्ये सुद्धा फरक होत जातो .या चित्रांमध्ये काळा, लाल, पांढरा यासारखे नैसर्गिक द्रव्यापासून तयार केलेले रंग वापरलेला असतात .त्या त्या कालातील लोकांचे त्यांच्या परसपरिसरा संबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्वतःचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञानाचा विकास कसा होत गेला, याचे कल्पना चित्राद्वारे करता येऊ शकते.
तुम्हाला माहित आहे का?
महाराष्ट्रातील वारली चित्र परंपरा आणि पिंगूळ किंवा चित्रकथी परंपरा ही लोककला वैशालीची निवडक उदाहरणे आहेत. जिल्ह्यातील जिव्या सोम्या मसे यांचा वारली चित्रकला लोकप्रिय करण्यात फार मोठा वाटा आहे. त्यांना त्यांच्या वारस मित्रांसाठी भारतीय आणि जगती स्तरावरचे अनेक पुरस्कार मिळालेल्या सन 2011 मध्ये त्यांना पद्मश्री हा बहुमान मिळाला आहे.
अभिजात चित्रकला:
प्राचीन भारतीय वाड्मयामध्ये विविध कलासंबंधी सांगोपांग विचार झालेले दिसतो. त्यामध्ये एकूण 64 कलांचा उल्लेख आहे. त्यामध्ये चित्रकलेचा उल्लेख आलेखन किंवा आलेख्य विद्या या नावाने केलाय. आलेख्य विद्येची शरांगे म्हणजे सहा महत्त्वाचे पहिले आहेत. त्याचा विचार प्राचीन भारतीयांनी अत्यंत बारकाईने केला होता. त्यामध्ये रूप भेद (विविध आकार) प्रमाण (प्रमाणबद्ध) रचना आणि मोजमाप भाव (भाव प्रदर्शन) लावण्यायोजन सौंदर्याचा स्पर्श सादृश्यता वास्तवांच्या जवळ जाणारे चित्र आणि वर्ण का भंग रंगाचा आयोजन यांचा समावेश आहे. विविध धार्मिक पंथाचे आग्रमग्रंथ पुराने आणि वास्तुशास्त्रावरील ग्रंथ यामधून चित्रकला शिल्पकला यांच्यासंबंधीचा विचार मंदिर बांधणीच्या संदर्भात केलेला दिसतो.
हस्तलिखित मधील लघुचित्रे:
हस्तलिखितरण मधील लघुचित्रावर सुरुवातीला पर्शियन शैलीचा प्रभाव होता. दक्षिणेकडे मुस्लिम राजवटींच्या श्रेया खालील दख्खनीय लघुचित्र शैली विकसित झाली. मुगल सम्राट अकबराच्या कारकिर्दीत पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल लघुचित्र शैलीचा उदय झाला.
युरोपीय चित्रशैली:
ब्रिटिश राजवटीत 500 चे चित्र शैलीचा प्रभाव भारतीय चित्र श्रेय पडलेला दिसतो. पुण्यातील शनिवारवाडा सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात जेम्स वेळ या स्कुटी चित्रकाराचे नेतृत्वाखाली एक कला शाळा स्थापन करण्यात आले होते. त्याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र काढलं होतं. वेस्ट सोबत काम करणारे एक मोठी मराठी चित्रकार गंगाराम तांबट यांचे येथे विशेष उल्लेख करायला हवा . त्यांनी वेरूळ कारले याची लेण्यांची चित्र काढली होती. त्यांची काही चित्रे अमेरिकेतील विद्यापीठात असलेल्या एल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट येथे जतन केलेले आहेत. चित्र वस्तूंचे उपयोग चित्र हे पाश्चाचे चित्र शैलीचे वैशिष्ट्य समाजाले जाते.मुंबईत सण 1857 मध्ये स्थापन झालेल्या जे. जे .स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या पाश्चात्त्य कला शैलीचे शिक्षण देणाऱ्या शालेयतुन अनेक गुणवंत चित्रकार नावारूपाला आले. त्यातील पेस्तनजी बोमनजी म्हणजे अजिंठा लेण्यांमधील चित्रांच्या प्रत्येक कृती बनण्याचं काम केलं.

शिल्पकला:

शिल्पकला त्रिमती असते. उदाहरणार्थ, मूर्ती, पुतळा, कालापूर्ण भांडी आणि वस्तू. शिल्पे कोरली किंवा घडवली जातात. त्यासाठी दगड, धातू, माती यांचा उपयोग केला जातो. वेरूळचे कैलास लेणे हे अखंड जिल्हा अखंडातून कोरलेले अद्वितीय शिल्प आहे. सारणातील असे स्तंभाचे शीर्षावरील चार सिंहाच्या शिल्पा व आधारलेले चित्र हे भारताच्या राष्ट्रीय मानचिन्ह आहे.

Tuesday, 22 October 2024

आर्थिक विकास

 भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, पंचवार्षिक योजना व त्यांचे यशापयश, बँकांचा राष्ट्रीयकरण, वीस कलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप. 
मिश्र अर्थव्यवस्था:
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकाराच्या अर्थव्यवस्था स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते. प्रधानमंत्री पंडित नेहरू यांना कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्या ऐवजी मध्यमवर्गाचा अवलंब केला. काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती प्रत्येक कर्तव्यवस्थेचे काही फायदे आणि तोटे असतात.
अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीच्या असतात. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादन साधने समाजाच्या तसेच शासनाच्या मालकीचे असतात. मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते . भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्था भारताने प्राधान्य दिलेले आहेत या अर्थव्यवस्था आपणास तीन भाग दिसून येतात.
1) सार्वजनिक क्षेत्र: या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखली व व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ .संरक्षण साहित्य उत्पादन.
2) खाजगी क्षेत्र: या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योगांच्या मालकीचे असतात अर्थात त्यावर सरकारी देखरेख व नियंत्रण असते. उदाहरणार्थ, उपभोग्य वस्तू.

3)संयुक्त क्षेत्र: या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे, तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली चालवले जातात.
 पंचवार्षिक योजना:
भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने भारताचे पुरेपूर आर्थिक शोषण केलेले होते. दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ ,निष्कृष्ट राहणीमान, शेती व उद्योगधंदे यांचे उत्पादन क्षमता तसेच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधीचे मागासले पण अशा बिकट समस्या देशासमोर होता. त्या सोडण्यासाठी नियोजनाची गरज होती. 1950 मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते.
योजनांची उद्दिष्टे:
भारताच्या आर्थिक नियोजनाची सर्वसाधारणपणे उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. 
1) राष्ट्रीय उत्पादनात वाढ. 
2) मूलभूत उद्योगधंद्यावर भर देऊन झपाट आणि         
 उद्योगीकरण घडवून आणणे. 
3) अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वालंबी बनवा म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे. 
4) वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून, देऊन देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेणे.
5) प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणे. 
6) वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे. 
7) कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येने आळा     घाळणे .
पहिली पंचवार्षिक योजना (1951 ते 1956):
या योजनेत शेती,सामाजिक विकास जलसिंचन व पूर नियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग व खनिज, वाहतूक व दळणवळण ,शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्यात आला. नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारे ही योजना होती.
दुसरी पंचवार्षिक योजना (1956 ते 1961):
या योजनेत औद्योगीकीरणाचे महत्त्कांवाक्षी उद्दिष्ट साध्य करायचे होते. दुर्गापुर, भिलाई, राउरकेला येथील कारखाने, सेंद्रिय येथील रसायनिक खताचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरामपूरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना, विशाखापटटणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्चे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आली.
तिसरी पंचवार्षिक योजना (1961 ते 1966):
या योजनेत उद्योग व कृषी विकासाचे संतुलन साध्य करायचे होते दरसाल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे अवजड उद्योग वाहतूक व खनिज उद्योग विकास विषमतेचे निर्मूलन करणे आणि रोजगार संधी विस्तार हा मुख्य हेतू होता .

                    प्रसारमाध्यमे आणि इतिहास प्रसारमाध्यमांची ओळख : प्रसारमाध्यमे या शब्दात प्रसार आणि माध्यमे असे दोन शब्द आहेत. प्रसार चा...